एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही... पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...
उन्माद संपून जाईल तेव्हा खरे उरतील सकल जण पण त्याविन मग काय उरेल जमिनीत काय उगवेल आणि कोण काय पुरेल घरी काही, कुणाला न बोलता येऊन दाखव कुणाचा ना रुसवा घेऊन ये न कुणाला दिसता फिरून दाखव एक दिवस कुणाची शपथ न घेता ये ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या उरले सुरले कसे सावरले आवरले आणि आवरून कसे माजले सारे एकजात कसे वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात त्यांची उत्पत्ती बोल ठिपका आहोत आपण असे मार एक एक झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....