स्थित्यंतरे नको वाटतात , जैसे थे ची भूमिका किती सुखावह वाटते , प्रवास वेगात घडतो , वाचन , गाणी , कव्हर सोंग्स नाहीतर अभ्यास , अगदीच काही नाही तर गर्दीचं वाचन , केसांचे रंग , पेहराव , अंगकाठी , स्वभाव , शिव्या , आवाजातील हेल , राग , लोभ , प्रेम किंवा जास्तीत जास्त स्वार्थ…. घरी असणं , स्वतःबद्दल लिहिणं , स्वतःची लाल करणं , स्वतः खच्ची होणं , सर्व ठीक असत पण प्रवास आला की वेग आला , वेगाला नसतात थेहराव , गाडी पुढे जात असते , आपण पाहत बसायची मागे जाणारी झाड , डोंगर , माकडं , धड काही पाहता ही येत नाही … दगडं सारखीच वाटतात, त्यांना आपण रिलेट होतो , प्रकार बदल आपल्याला करता येत नाहीत , आपल्या हातात नाही , मोसमी कारणं एकतर मुलामे तरी चढवतात नाहीतर आकार तरी देतात , प्रवासात न कमावलेले पैसे पण खर्च होतात , मंदिरांना पाहून कौल पण लावता येत नाहीत मध्ये येत असतो तो वेग , घाटात मंदावतो , पण तेव्हा एकतर दरी पाहता येते नाहीतर डोंगर , हेच तर आवडत नाही ,अशीच परिस्थिती का नेहमी ? निवड !! का करायची निवड आणि एकच का ?? प्रवासात पाणी पण विकलं जात , बारमाही परा आठवतो , रगील असलेले मिनरल आठवतात … आपलं अस काय आहे ह्या जगात , सगळा व्यवहार आहे , प्रवासाची कारणं पण व्यवहारी असतात , कोण डील साठी , कोण नोकरी साठी , कोण लिखाणाची ओढ म्हणून , अनुभवाचा व्यवहार सर्व …. तथागता सारखा प्रवास जमला पाहिजे राव , ना त्याला वेग , ना कुठे व्यवहार , ना मुलामा ना मौसम … त्याचा प्रवास शारीरिक टेलीपोर्टेशन होतं जणू , होता आलं पाहिजे अणू पेक्षा सूक्ष्म , प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगवान , कालातीत प्रवास करता येतील , मग जमेलही म्हणतात प्रवास पिढ्यानमध्ये , कारण आहे त्या शरीराने तर तूला संत होता येणार नाहीय , घालमेल तुझी जाता जाणार नाहीय , खिडकीचा मोह काय तुला सुटणार नाहीय , तुझे केस प्रवास थांबल्याशिवाय स्थिर होणार नाहींयत…
माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर तशी सल राहावी मनाच्या पटलावर आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा निर्विकार आठवला पाहिजेल विश्वाचा...
Comments
Post a Comment