Skip to main content

कधी तू , कधी मी !

जगातील पहिली दोन भिन्न लिंगी माणसं जेव्हा भांडली असतील तेव्हा त्याचं कारण भूक असेल नाहीतर जास्तीत जास्त विचार केला तर प्रेम असेल , पण जेव्हा ती एकामेकांचा सहवासात किंवा स्पर्शात आली असतील तेव्हा मात्र सर्व विसरून एकरूप झाले असतील तेव्हाच तर तु वाचणारा आणि मी लिहणारा असेन , उद्या तू लिहीत असशील मी वाचत असेन बहुतेक ……
        ताफा भुकेचा कुठे न्यायचा आज शिकारीला , हे कोण सांगणार किंवा कोण ठरवणार ह्यावरून पहिला वाद झाला असेल ना तेव्हा कुठेतरी आजच्या राजकारणाची किंवा आजच्या लोकशाहीची , ठोकशाहिची सुरुवात झाली असेल , तेव्हा कुठे तू उभा राहतो आणि मी मतदान करतोय , नाहीतर तू मतदान करतोय मी उभा राहतोय , तू हुकूम देतोय मी सलाम करतोय आणि काहीसं vice versa ….
      कुठेतरी झाडाखाली चिमण्या हागल्या तेव्हा झाडं आली नवीन पालवी फुटली , तुझ्या माझ्या सारख्या कुणाला तरी शेतीची संकल्पना सुचली आणि आज तू पण उपाशी नाही आणि मी पण नाहीय , अपवाद उपाशी आहेत … म्हणून तर आज तू शेतकरी आणि मी  खातोय , तर कधी मी शेतकरी आहे आणि तू खातोय…….. हमीभावासाठी आंदोलन पण करतोय …. 
       कुणीतरी गोल दगड फिरवला एकांताचा विट येऊन , मडकी झाली आणि चाकं झाली गाड्या आल्या , कधी तू ड्रायव्हर तर कधी मी प्यासेंजर तर कधी मी ड्रायव्हर….  आज तू गियर टाकताना विचार कर…..!
        कुणीतरी बनवल्या कलाकृती , चित्र , शीलालेख म्हणून आज उत्खननात सापडत आहे कधी तू , तर कधी मी , सर्व तेच आहे , सर्व तिथेच आहे , काहीच बदललं नाही , बदलत आहे तर फक्त एकच , कधी तू , तर कधी मी…..!!

अजिंक्य रोकडे
        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणसाने गझल ऐकली पाहिजे 🌼

माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित  पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने  मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे  डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे  पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता  बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे  कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर  तशी सल राहावी मनाच्या पटलावर  आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा  निर्विकार आठवला पाहिजेल  विश्वाचा...

गुडूप व्हावं लागतं...😌

वारसा व्हायला  आधी गुडूप व्हायला लागतं उदरात आज गेलेलं  खोदतील तेव्हा  रक्त मिळेल  का कार्बनच जास्त मिळेल उकरून उकरून  अस काय उकरतो आपण भूतकाळ  इतिहास  मढी काय निकष असतील तरी किती सापळ्यांचा ढीग लागतो स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात का मदरबोर्ड पण चालतील  संस्कृती आणि खाद्य  पेटित ठेवलेल  रेशनकार्ड पाहून समजतील डब्यात तांदूळ करंड्यात कुंकू देवळात देव सगळं इथेच असेल निकष असे काय आहेत जागतिक व्हायचे   व्यापारावर चलनावर  देवावर मूर्तीवर चित्रावर  की फक्त गुडूप होण्यावर की वारसा व्हायला  आधी गुडूपच व्हायला लागतं अजिंक्य रोकडे.....

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...