Skip to main content

न्यूट्रल मी....😐

स्थळ - सरकारी इस्पितळ 

      तर केसपेपरचे पैसे एकाने आमच्याकडे सुट्टे न्हवते म्हणून भरले , त्याला सर्दी ताप होता पण उपचाराआधी त्याला टेस्ट करायला सांगितली , आमचं काही वेगळं काम होतं , त्यात आम्हाला जाम मदत झाली , आमचं काम झालं आम्ही बाहेर निघायला आलो , पण तो व्यक्ती गाडीवर गडबडीत रागात स्पीड मध्ये जाऊ लागला , तिथला स्टाफ त्याला हाक मारत होता , आमचे पैसे भरले म्हणून आम्ही त्याला हाक मारत होतो थांबला , म्हणाला मला गरज नाही , दोन तास झाले आहे इथे साधी सर्दी आहे मला , म्हणून लोकं येत नाहीत तुमच्या अश्या वागण्याने ….!!! आणि तो निघून गेला , आम्ही सांगितलं जाऊदे त्याला …. मी म्हणालो , लोकांकडे संयम नाही … घरी आलो झोपलो..

◆◆◆◆◆◆◆

     मानव संसाधन विकास मध्ये आरोग्य हा विषय जाम hectic आहे , ह्या महामारीचा काळात सरकारी आरोग्य यंत्रणेच तस कौतुक केलं पाहिजे कारण हे काम कस चालतं ते मी सामाजिक कार्यकर्ते व pandemic नावाची सीरिज आहे त्यात भारतातील सरकारी यंत्रणेने एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ह्या आधी आलेल्या महामारी व रोग कसे हातातळे तसलं काहीसं दाखवलं होतं , सगळ्या योजना भरभरून आहेत , त्याचा लोकं वापर करत आहेत , योग्य ते उपचार उपलब्ध आहेत , इतकी काळजी घ्यावी सरकारने आपली , तस पण संस्थात्मक प्रसूती साठी आपण प्रयत्न केले पाहिजे आहेत असं पण मी दोघं तिघे जणांना बोललो आहे , कारण योजना इतक्या परिपूर्ण वाटतात की खरंच आपण पण त्या गोष्टीना प्राधान्य दिलं पाहिजे ना की खाजगी रुग्णालयांना ..…. पण काही ठिकाणी तश्या सुविधा नाहीयत कारण वापर नाही म्हणून उपकरणं नाहीत  , बर ठीक आहे आपलं सामान्य मनाचं समाधान करणं महत्वाचं आहे , लोकांमध्ये जागृती हवी आहे , ती आपण करूच , आपल्यापासून सुरू करू म्हणून मी एक निर्णय फार पूर्वीच घेतला आहे की संस्थात्मक उपचार घ्यायचे , इतर ठिकाणी १००० १५०० घालवणं देखील वाचतं आणि आपल्या पासून काहीतरी नवीन सुरुवात आपल्या सोबत आपले इतर मित्र देखील माझ्या सोबत येत जातील , उपचार घेतील …. 
       मला बरं वाटत न्हवत घसा खवखवणे , थोडी सर्दी आणि सुक्या खोकल्यामुळे पोटात डाव्या साईड मध्ये तणाव , तर मी निघालो पहिल्या दिवशी डॉक्टर न्हवते स्टाफ नुसार डॉक्टर होते येऊन गेले , मी म्हणालो इतका काही मी आजारी नाहीय एक दिवस सहन करू शकतो सकाळची वेळ विचारून मी हजर राहिलो , केसपेपर काढला आईने काढला . केसपेपर काढताना माझ्या मागे एक कुटुंब होतं , तसं इकडे तिकडे पाहणं , आत्मविश्वास कमी , भीती जास्त अश्या अवस्थतेत तर मग हे गरीब असणार असे काहीसे माझ्या निकषांवर मी सांगत आहे ना की पेहरावावर , त्यांचा हातात एक काही महिन्यांचं लेकरू , जाम दुर्दैवी खोकत होतं , अंगावर काटा येईल असं , मी माझा खोकला विसरलो …. मी आतमध्ये गेलो डॉक्टरांची नजर मोबाईल मध्ये , मी माझा त्रास सगळा सांगितला , त्यांनी न बघताच सांगितलं केसपेपर काढ , मी म्हणलं आहे , त्यांनी माझ्याकडे न बघताच केसपेपर साठी हात पुढे केला , औषधं लिहिली आणि त्यांचा कृपाकटाक्ष न घेताच केवळ ३ ४ मिनिटात मी बाहेर …. नन्तर मम्मी आतमध्ये गेली ती पण तशीच बाहेर आली , मी बाहेर येऊन स्टाफला ऐकू जाईल अश्या आवाजात बोललो अग ते बघत पण नाहीत पेशंटकडे … तेवढ्यात ती बाई बाळाला घेऊन बाहेर आली आणि औषधं घ्यायला लाईन मध्ये आली , मी स्टाफला बोललो की एक काम करा इथेच लक्षणं ऐका आणि इथेच औषधं देत जा आतमध्ये तर पाहत देखील नाहीत पेशंटकडे , त्या मुलाचा खोकला माझ्या मागे सुरू होता , त्या बाईला विचारलं अहो बाळाला हात तरी लावला का ??? ती मान हलवतच नाही म्हणाली …. काय करू समजेना म्हणलं असच असेल आता असर पडणार असेल निष्णात डॉक्टर असतील जेणेकरुन पाहताच त्यांना सगळं समजत असेल पाहू फरक पडतो का गोळ्यांनी … आता फरक पडेल न पडेल मला माहित नाही मी असा न तसा बरा होऊ शकतो , माझी परिस्थिती आहे खाजगी उपचार घ्यायची पण त्या बाळाचं काय असा विचार गाडी चालवताना होता , चुकीचे इंडिकेटर देत गाडी चालवत होतो डोकं सुन्न झालं , बाळाचं काय ..?? 
     पुढे गाडी चालवताना पण मी न्यूट्रल राहून विचार करायचा प्रयत्न केला पण न्हवतं जमत , एका पुलाखालून जाताना वरतून ट्रेन गेली , मी तिथून गाडी फास्ट मारली , ह्या घटनेमुळे मला भीती वाटली असेल का ?? मी मम्मीला बोललो अग हा पूल पडणार तर नाय ना ?? ते वागले तसं जरासं जरी हा पूल बांधणारे वागले तर काय होईल…?? मम्मी म्हणाली , पिक्चर मध्ये तरी काय वेगळं दाखवतात …
      एकंदरीत ही भीती मला वाटू शकते , तर खरच जे सामाजिकदृष्ट्या , आर्थिकदृष्टीने फार वंचीत आहेत त्यांना भीती देखील वाटत नसेल , ते आपल्या आपल्या आयुष्यात सहन करत आलबेल असतील…. तर मी सरकारी उपचार घेईनच ह्यापुढे देखील पण प्रत्येक जण असा नसेल , लोकं पर्याय शोधत असतात , इथे तर जीवाचा प्रश्न आहे , लोकं कर्ज काढून जीव वाचवतील … पण मग आपण लोकांचा दृष्टीकोन संस्थात्मक उपचार घेण्यासाठी तयार का करायचा हा प्रश्न मला सतावत आहे …. नाहीतर बस्स सर्पदंश आणि विंचूदंश आणि लसीकरण अश्या कारणांसाठी मर्यादित राहतील ह्या इमारती …. 

#बाकीआलबेल

अजिंक्य रोकडे

Comments

Popular posts from this blog

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....