Skip to main content

बदलणाऱ्या प्रायोरिटीज

 गणपती जवळ आले की भाताची पाती अजून गडद हिरवी होतात , बारीक बारीक कण यायला सुरुवात होते , त्यात दूध असतं , दाताखाली दाबून धरलं की फार मस्त लागतं , कुठल्यातरी केमिकल मुळे त्यात स्त्रवला असतो म्हणे म्हणून त्याचा सुवास येतो , काल परवाच वाचलं आहे , पण आता दाताखाली भात फक्त शिजवलेला येतो , लक्षातच राहत नाही अश्या रात्रीच का आठवण येते असली काही उगाचच करायची , ह्या वर्षी भात लावला आहे थोड्या जागेत , दिवसेंदिवस त्याला वाढताना पाहताना जाम आनंद होतो , तो वाढत जातोय तसा त्याचा रंग बदलतो , एक काडीचा भात आहे आमचा त्यामुळे घनदाट नाही , त्याचा मधून माणूस फिरू शकतो , गणपतीनन्तर चतुर येतात मोठ्या संख्येत , काही चतुर सिंगल असतात तर काही एकामेकावर स्वार , हिराच्या झाडूला हातात घेऊन हात अलबेल हवेत फिरवले की दोन चतुर मिळायचे त्यांना दोरीने बांधून मग दाराच्या शिगेला बांधून ठेवायचो पण सकाळी मेल्यावर जाम वाटायचं पण पुन्हा तोच दिनक्रम , भाताच्या चोंड्यात मधोमध जाऊन त्यांना पकडाव अस वाटायचं पण तेव्हा ओरडा नको म्हणून पायवाटेने शिकार चालायची , आता थोड्या दिवसांनी आमच्या भाताची वाढ होईल तेव्हा खूप चतुर यावे अशी अपेक्षा आहे , शिकार करायला न्हवे तर भाताच्या मधोमध जाऊन मनाची शांती करायला , कोण काय बोलतो पाहू मग ! फक्त पाहत बसायचं आहे कसे चेन ने फिरतात अस्थावयस्थ .

      काल वर्गात कवडे , कबुतर पकडायला फासकी कशी लावू हा प्रश्न विचारला , मी सांगितलं नाही पण त्यांनी ते शोधून काढल , त्यावरून मी लावलेली पहिली फासकी आठवली , त्यात कोण जाणे कसा मला एक पोपट मिळाला , मी त्याला फडफडताना पाहून जाम टरकलो , एका तरबेज मित्राला घेऊन आलो , त्याने त्याला काढलं हातात घेतल , माझं आता नाव होणार होतं , पण त्याला हात लावायला भीती वाटत होती मग थोड्यावेळाने भीती कमी झाली मी हातात घेतल त्याला , फार मुलायम जणूकाही त्याच्यामध्ये रक्त नाही फक्त हवा आहे , पण आता त्याला ठेवायचं कस , पैसे जमवून पिंजरा आणायच ठरलं पण आजची रात्र कशी काढायची मग आमचा उंदराचा पिंजरा कामी आला , सकाळी उठून पहिला पिंजरा बघितला पाहतो तर त्याने त्याचे गज वाकवून पळ काढली होती फार वाईट वाटलं मला , नन्तर मी पोपट विकत घ्यायचा प्रयत्न केला पण सगळे कबुतर विकणारे होते , मग कबुतर भेटला माझ्या फासकी मध्ये त्याला मी पायाला दोरी बांधून ठेवला होता पण तो पण दोन तीन दिवसाने सुटला , तस पण त्याच्यात तेज उरलं न्हवतं , तो उडताना दिसायचा दोरीसकट……

     परवा कुणीतरी नखभुंग्याचा फोटो टाकला होता , काटेरी झाडावर असायचे खूप फिरलो आहे त्याचा मागे , त्यांना एका बरणीत ठेवायचो , त्या बरणीला हवा जाण्यासाठी होल होते , पूर्वी गणपती मुर्त्या साध्या रंगाच्या असायच्या नंतर भडक चमकणारा रंग यायला लागला , तशी पाठ असायची त्यांची , मला वाटायचं कुणीतरी ह्या भुंग्याना खरंच तर रंग नसेल ना देत झिरोच्या ब्रशने , नर मादी बरणीत ठेवून अजून एक अपोआप होईल असं वाटायचं पण अस कधी झालं नाही , जमलं नसेल त्यांच . एक दिवस ते पण मरायचे , मग त्यांच नख काढून फेविकोलने आपल्या नखांवर चिकटवून शाळेत जायचो , खेळताना वगरे ते पण तुटून जायचं , आता नखभुंगे दिसत नाहीत , त्या साठी लागणारी पायपीट आणि उत्सुकता किंवा असुरी आनंदात असणारी निरागसता आता उरली नाही का ? सगळं आहे तसच आहे पण मग आपण बदललो कसे , माणसाच्या प्रयोरिटीज वयापरत्वे का बदलतात , हे सगळे अजून यायचे तेव्हा येतात , जायचं तेव्हाच जातात , स्वतःच स्वतःचा घात पण करीत नाही , कोणीतरी मुलगा आपल्याला मारत आहे म्हणून त्याचा पासून लांब पण जात नाहीत… सगळं ठरलेलं असतं आपणच चुकतो जपता येत नाही फार जवळ जातो , गेलो तर परत येतो , नाहीतर गुदमरवतो , बांधतो , उपकतो , सगळं करून पाहतो आणि मग आपणच त्रास करून घेतो … अस बरच काही आहे … बाकी अलबेल…!! 


अजिंक्य रोकडे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणसाने गझल ऐकली पाहिजे 🌼

माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित  पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने  मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे  डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे  पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता  बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे  कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर  तशी सल राहावी मनाच्या पटलावर  आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा  निर्विकार आठवला पाहिजेल  विश्वाचा...

गुडूप व्हावं लागतं...😌

वारसा व्हायला  आधी गुडूप व्हायला लागतं उदरात आज गेलेलं  खोदतील तेव्हा  रक्त मिळेल  का कार्बनच जास्त मिळेल उकरून उकरून  अस काय उकरतो आपण भूतकाळ  इतिहास  मढी काय निकष असतील तरी किती सापळ्यांचा ढीग लागतो स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात का मदरबोर्ड पण चालतील  संस्कृती आणि खाद्य  पेटित ठेवलेल  रेशनकार्ड पाहून समजतील डब्यात तांदूळ करंड्यात कुंकू देवळात देव सगळं इथेच असेल निकष असे काय आहेत जागतिक व्हायचे   व्यापारावर चलनावर  देवावर मूर्तीवर चित्रावर  की फक्त गुडूप होण्यावर की वारसा व्हायला  आधी गुडूपच व्हायला लागतं अजिंक्य रोकडे.....

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...