Skip to main content

बदलणाऱ्या प्रायोरिटीज

 गणपती जवळ आले की भाताची पाती अजून गडद हिरवी होतात , बारीक बारीक कण यायला सुरुवात होते , त्यात दूध असतं , दाताखाली दाबून धरलं की फार मस्त लागतं , कुठल्यातरी केमिकल मुळे त्यात स्त्रवला असतो म्हणे म्हणून त्याचा सुवास येतो , काल परवाच वाचलं आहे , पण आता दाताखाली भात फक्त शिजवलेला येतो , लक्षातच राहत नाही अश्या रात्रीच का आठवण येते असली काही उगाचच करायची , ह्या वर्षी भात लावला आहे थोड्या जागेत , दिवसेंदिवस त्याला वाढताना पाहताना जाम आनंद होतो , तो वाढत जातोय तसा त्याचा रंग बदलतो , एक काडीचा भात आहे आमचा त्यामुळे घनदाट नाही , त्याचा मधून माणूस फिरू शकतो , गणपतीनन्तर चतुर येतात मोठ्या संख्येत , काही चतुर सिंगल असतात तर काही एकामेकावर स्वार , हिराच्या झाडूला हातात घेऊन हात अलबेल हवेत फिरवले की दोन चतुर मिळायचे त्यांना दोरीने बांधून मग दाराच्या शिगेला बांधून ठेवायचो पण सकाळी मेल्यावर जाम वाटायचं पण पुन्हा तोच दिनक्रम , भाताच्या चोंड्यात मधोमध जाऊन त्यांना पकडाव अस वाटायचं पण तेव्हा ओरडा नको म्हणून पायवाटेने शिकार चालायची , आता थोड्या दिवसांनी आमच्या भाताची वाढ होईल तेव्हा खूप चतुर यावे अशी अपेक्षा आहे , शिकार करायला न्हवे तर भाताच्या मधोमध जाऊन मनाची शांती करायला , कोण काय बोलतो पाहू मग ! फक्त पाहत बसायचं आहे कसे चेन ने फिरतात अस्थावयस्थ .

      काल वर्गात कवडे , कबुतर पकडायला फासकी कशी लावू हा प्रश्न विचारला , मी सांगितलं नाही पण त्यांनी ते शोधून काढल , त्यावरून मी लावलेली पहिली फासकी आठवली , त्यात कोण जाणे कसा मला एक पोपट मिळाला , मी त्याला फडफडताना पाहून जाम टरकलो , एका तरबेज मित्राला घेऊन आलो , त्याने त्याला काढलं हातात घेतल , माझं आता नाव होणार होतं , पण त्याला हात लावायला भीती वाटत होती मग थोड्यावेळाने भीती कमी झाली मी हातात घेतल त्याला , फार मुलायम जणूकाही त्याच्यामध्ये रक्त नाही फक्त हवा आहे , पण आता त्याला ठेवायचं कस , पैसे जमवून पिंजरा आणायच ठरलं पण आजची रात्र कशी काढायची मग आमचा उंदराचा पिंजरा कामी आला , सकाळी उठून पहिला पिंजरा बघितला पाहतो तर त्याने त्याचे गज वाकवून पळ काढली होती फार वाईट वाटलं मला , नन्तर मी पोपट विकत घ्यायचा प्रयत्न केला पण सगळे कबुतर विकणारे होते , मग कबुतर भेटला माझ्या फासकी मध्ये त्याला मी पायाला दोरी बांधून ठेवला होता पण तो पण दोन तीन दिवसाने सुटला , तस पण त्याच्यात तेज उरलं न्हवतं , तो उडताना दिसायचा दोरीसकट……

     परवा कुणीतरी नखभुंग्याचा फोटो टाकला होता , काटेरी झाडावर असायचे खूप फिरलो आहे त्याचा मागे , त्यांना एका बरणीत ठेवायचो , त्या बरणीला हवा जाण्यासाठी होल होते , पूर्वी गणपती मुर्त्या साध्या रंगाच्या असायच्या नंतर भडक चमकणारा रंग यायला लागला , तशी पाठ असायची त्यांची , मला वाटायचं कुणीतरी ह्या भुंग्याना खरंच तर रंग नसेल ना देत झिरोच्या ब्रशने , नर मादी बरणीत ठेवून अजून एक अपोआप होईल असं वाटायचं पण अस कधी झालं नाही , जमलं नसेल त्यांच . एक दिवस ते पण मरायचे , मग त्यांच नख काढून फेविकोलने आपल्या नखांवर चिकटवून शाळेत जायचो , खेळताना वगरे ते पण तुटून जायचं , आता नखभुंगे दिसत नाहीत , त्या साठी लागणारी पायपीट आणि उत्सुकता किंवा असुरी आनंदात असणारी निरागसता आता उरली नाही का ? सगळं आहे तसच आहे पण मग आपण बदललो कसे , माणसाच्या प्रयोरिटीज वयापरत्वे का बदलतात , हे सगळे अजून यायचे तेव्हा येतात , जायचं तेव्हाच जातात , स्वतःच स्वतःचा घात पण करीत नाही , कोणीतरी मुलगा आपल्याला मारत आहे म्हणून त्याचा पासून लांब पण जात नाहीत… सगळं ठरलेलं असतं आपणच चुकतो जपता येत नाही फार जवळ जातो , गेलो तर परत येतो , नाहीतर गुदमरवतो , बांधतो , उपकतो , सगळं करून पाहतो आणि मग आपणच त्रास करून घेतो … अस बरच काही आहे … बाकी अलबेल…!! 


अजिंक्य रोकडे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....