Posts

प्ल्यूटो🌼

Image
murphy's law तसा घाणेरडा प्रकार, वैज्ञानिकदृष्ट्या तो काही सिद्ध वगरे झालेला नाहीय पण तो काम करतो खतरनाक, तसं काही गोष्टी सिद्ध व्हाव्याच लागतात असं देखील काही नाही, काही गोष्टी दाबून ठेवाव्या लागतात अंतरमनात, असे जड शब्द लेख तरी भारी बनवतात नशीब कोवळ्या वयात काही पुस्तकं अशी वाचून ठेवली आहेत, त्या शिवाय भूमिकेला भक्कमपणा येत नाही, लोकांना आपण दूरचे वाटू लागतो जेव्हा सगळं तरल दिसू लागतं मग कोणत्या अपेक्षित गोष्टी न का होईना सगळं ठीकच आहे हा अट्टाहास हवा वाटतो, ह्या साऱ्या कोलाहलात आपण आपले विचार आपल्यासोबत होणाऱ्या घटना सगळ्या चिंधी म्हणून जग पाहत असेल तेव्हाच आपण घडत असलेल्या पेक्षा वाईट चिंतून बुध्दासारखे हसत असतो किंवा हळहळत असतो, एकादी गोष्ट वाईट होतच गेली तर ती वाईटच होते असं काही ऐकून पाहून वाचून अजून वाईट होण्याची शाश्वती मिळते त्यावेळेला मोटिवेशन म्हणून राशीभविष्य वाचताना लाभ होईल वाचून अजून हळहळ होते, लाभ होतात ते कोणत्या बाबतीत किती बाबतीत आणि कोणत्या परिप्रेक्षात, कोण काही सहज बोलून जातंय तेव्हा त्याचे शब्द, वागणं लाभामध्ये धरून ठेवायचे असतात का? दिवस चांगल्य

प्रवास आपला कधी नं जावा संपून...✨🏔️

Image
विरान पडलेल्या वाळवंटी प्रदेशात बर्फ अचानक पडावा इगलू मात्र आपला सुका सुका असावा त्यात बॅगेतून आणलेला कांदा मिरची टोमॅटो सारं काढून दोन चार पाईनची फाटी आणून आग लावावी दगडाने दगडावर रगडून तुझ्या माझ्या थरथरत्या हाताला मग आगीची उब त्या आगीवर भगूणं छोटंसं ठेवून करावे पदार्थ आपण हवे नको आपल्याला दोघांनी मिळून भूक मिटवावी घासावर घास छोटे ठेऊन पसरावी पश्मिना चादर तलम झोपावं दोघांनी कुशीत कुशी घालून स्पर्शावर स्पर्श करावा हट्टी बनून झोपेत जागेपणीची स्वप्न पुरी करावी मग पाहिलेली स्वप्न पूर्णत्वास न्यावी मग स्वप्नात स्वप्न बनून राहावं डोळ्यांवर डोळे ठेवावे काजळाने मिटून सकाळ व्हावी चेहऱ्यासमोर एकमेकांच्या चेहरे नवीन वाटावे एकमेकांचे इगलू मधून बाहेर येऊन पुन्हा वाट शोधावी पायावर पाय ठेऊन चालावी दोघांनी  प्रवास आपला कधी नं जावा संपून... अजिंक्य रोकडे

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल.. 🌼

Image
प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल तेव्हा तू जाशील दूर रानात तेव्हा तिथे खूप सारी घनदाट झाडी मिळेल पण ओलावा शोधत असताना तुला समजेल माझे विचार किती तरल होते हातात हात घेऊन जेव्हा वाळूवर पाय रोवून तुम्ही जेव्हा प्रेम करत असाल तेव्हा समजेल माझी नजर क्षितिज भेदत होती  कॅफे मध्ये वाफालणारी थंड कॉफ़ी तुम्ही एका स्ट्राव मधून पिऊ लागाल तेव्हा माझी तहान तुझ्या लाळेपेक्षा मोठी होती हे समजेल तुम्ही एकादी निर्जन जागा पहाल आडवे इन्फ्रंट होत जाल तेव्हा समजेल माझ्या मनात बस स्पर्शाच्या भावना होत्या तुम्ही उभे राहाल बोहल्यावर तेव्हा संगीत असं विरश्री मध्ये असेल पण तूला माझी आठवन येईल आणि समजेल मी कसा सुमधुर होतो.. #बाकीआलबेल अजिंक्य रोकडे

बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल 🌼

Image
जगाविषयीची कटुता विसरून आपण प्रेम करत सुटलो पाहिजेल ह्या साऱ्या सणासुदीत आपण तारखा विसरत राहता आलं पाहिजेल मोजलेले पैसे आलेल्यातून वजा झाल्यावर हसू कायम राहीलं पाहिजेल ह्या साऱ्या वेळेत न होणाऱ्या गोष्टी आपण सहन करत ओठांवर हसू कायम ठेवता आलं पाहीजे काहीही असो आनंदी राहिलं पाहिजेल म्हणणारा कसा चुतिया आहे हे त्याने अंतर्मनाला विचारलं पाहिजेल उगा का कोण बुद्धत्वाला जातो असं वागता आलं पाहिजे कि बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल  कालातीत प्रवास करता आला पाहिजेल अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

महत्वाच काहीतरी

Image
यात काहीही शंका नाही कि शिक्षण माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या संविधानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद कलम २१(A) अंतर्गत करण्यात आली आहे. तर अस आहे कि ७०% लोकसंख्या, जर खाजगीकरणा झाले तर हा खर्च उचलू शकणार नाहीत . गरीब व कष्टकरी मूले जर काही प्रमाणात शिक्षण घेत असतील तर मोफत शिक्षणाच्या धोरणामुळे, मूलभूत हक्काच्या मूलभूतपणाचा गाभा प्रतिष्ठा राखणे हा आहे, जर शिक्षणाचे खाजगीकरण झाले तर एक ठराविक वर्गच त्याचा लाभ घेऊ शकतो आणि इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. शिक्षणाकडे जर व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं तर शिक्षण आणि ज्ञान देणे हे मुद्दे दुय्यम होऊन फक्त आर्थिक प्राप्तीकडे कल वाढेल. मागच्या वर्षी १ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली होती तेव्हा मी लेख लिहलेला होता आणि आता देखील 'समूह शाळा' धोरण राबवण्याचा हट्ट प्रशासनाने केला आहे, या धोरणाला सगळीकडून विरोध चालू असताना देखील हा सर्वे व धोरण पुढे रेटले जात आहे. गावपाड्यात शाळा जवळ आहे म्हणून येणारी कितीतरी मुलं आहेत किंवा पोषण आहार मिळतो म्हणून येणारी मुलं आहेत आणि ही

चाफा कधीच कोमेजू नये 🌼

Image
चाफा कधीच कोमेजू नये हा माझा हट्ट खरा त्याचा वास घेत राहायला हात वरती करू नये  छातीपाशी खिशात ठेऊन घेता यावा निरंतर खरं तर केसं पण पिकू नये कुणाची नां कुणाला ययातिची फिलिंग यावी नां कुणी यतीची वाट पाहावी सगळं कसं चालू राहावं कष्टाविना चालू रहावं दुःखाविना  असावं सगळं कसं आलबेल चाफा सुकू नये कधी सुवास कोमेजू नये कधी कधी वाटतं त्यांना तोडू पण नये त्यांना पण जगू द्यावं असंच सुवासिक नाकं न्ह्यावी फुलाजवळ होऊ नं द्यावा मृत्यू देव,माणूस कुणाच्या चरणी नको कुणाचा आवडता नको होऊ द्यावं त्याला चाफ्याची जिंदगी त्यालाच माहित सुंदरतेचे भोग सगळे आवडतीचे रोग सगळे मग म्हणाल चाफा बोलेना चाफा चालेना कसा चालेल कसा बोलेल चुकून विचार येऊ नये चाफा कधीच कोमेजू नये अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

मी मेसेज करत जातो 🤍✨

Image
काल स्वप्नात तिला काल्पनिक hii केला मी, बोललो काहीसं, सांगितलं भूक लागतेय फार आणि खूप सारं खाऊन पुन्हा भूक लागतेय नाही खाल्लं कि विकनेस येतो विचाराने, तू नाय नाय करत तरी माझा विचार करत असशील का तुला भूक लागत असेल का कि जेवण झाला का हा काल्पनिक मेसेज माझा जातोय तुला मग मी गारव्या मध्ये गरम शोधत बुरमूस टोचणारी घेऊन हवं नको असलेलं ऍडजस्ट करत खाज उताणा झोपून तुझ्या भावना चेपत जातोय निरामय आत्म्याच्या भाराखाली हलक्या शरीराने तेव्हा तुला मेसेज जातोय झोपलीस का, तू झोपत अशील का विचाराने झोपेत साप वगरे येतात मी लय घाण घाण स्वप्न बघतोय लोकांना मारतोय, apocalypse पाहतोय पेट्रोल वगरेचा जागतिक पाऊस पडत आहे मी हतबल सगळं पाहून पळत आहे लोकं पळत आहेत मी घाबरून जातोय खुश होतोय लोकांना पळताना आणि अचानक माझा तोल जाऊन पडतोय आणि उठतोय झोपेतून तेव्हा माझी  ऍड्रेणिल रश जो सत्यात नाही तो स्वप्नांत पूर्ण झाला म्हणून उठून घाबरलेला खुश मी, मी घाण स्वप्न असंच पाहत गेलो, गिल्टी झालो, चिवळत बसलो गु घाण, तुला असं झालंय का कधी, असं निरपेक्ष वेडेपणाची स्वप्न तुला अधून मधून पडत असतील का तेव्हा मी मेसेज करतो,

बाकी आलबेल अर्थहीन आहे 😵‍💫

Image
कविता करूया का विचाराने कविता होतेय अनामिक लागलेली आर्थिक भीक कवितेच्या आड येतेय विचार आणि प्रगल्भता उसने आलेले विचार असामान्य असलेले विचार असामान्य असलेले आचार आणि ह्यात काहीच साम्य नसलेलं आयुष्य ह्या सगळ्या कोलाहालात झालेला कवी लाचार कविता उरात आहे सत्यात नाही सत्यातून खोट्यात पण नाही येत नाहीय जोर लावून वाटतंय करावी भावना आहे खवून शब्द यमक होईल पण करतो उसवून उगच शिवी नको बघुया फसवून साला आता मनं सांभाळू वाटतात पत्रे उडाले म्हणतात नां लागले कि कविता सोज्वळ करतोय असल्या हजारो विचारांचं मंथन करतोय कोण म्हणतंय कवितेला अर्थ हवा कोण म्हणतंय त्याला यमक हवं आपल्याला पटलेलं रुचलेलं सुचलेलं अर्थहीन काही का असेना अर्थहीनच गमक हवं बाकी आलबेल कविता करत जातो बाकी आलबेल गृहीत धरत जातो बाकी आलबेल अर्थहीन आहे मर्म शोधू नका त्याच्या शब्दात अर्थ शोधू नका #बाकी आलबेल अजिंक्य रोकडे