Skip to main content

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पहावं , कस वाटलं असेल तिला , ती गेली , पाहत बसलो , एरवी वेळेवर न येणाऱ्या महामंडळाच्या गाड्या आज मात्र वेळेवर येऊ पाहत होत्या , ती गाडीत बसली , गाडी जाईपर्यंत पाहत बसलो , शेवटचा घास आनंदाने खाऊ म्हणलं तर मिरची दाताखाली आली , खूप पाणी प्यायलो …..
      मला तुम बिन २ आवडलेला , खरच आवडलेला , त्यातलं कोणतंही गाणं मी ऐकायचा मूडला आलेलो , मी आठवू लागलो काहीतरी कनेक्शन आहे राव ….!!! 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

        घरी आल्यावर समजलं आपण भिजलो आहोत , रेनकोटच्या चैनीतून पाणी आतमध्ये येतच कस , शरीराची एक लाईन पूर्ण भिजली , मुळात रेनकोट घालवाच का मग ? मूळ उद्देशच जर गंडत असेल तर काय फायदा ? शेवटी टॉवेलने अंग सहज पुसलं जातं , पण केस लगेच सुकत नाहीत , ओलावा राहतो  डोक्याचा स्किनवर…. रेनकोट कोकणच्या पावसात फसतो …!!! चुलीजवळ जाऊन ऊब मिळतेय पण थोड्या वेळाने त्याचे पण चटके लागतात …. अंधार पडला , जेवलो आणि गादी अंथरली , आजकाल व्हाट्सएपचे मेसेज बाहेर दिसत का नाही मला , आधी कॉलेजला असताना मोबाईलच्या हर एक सेटिंग करता येत होत्या मला आता का जमत नाहीत ? का मला करायला कंटाळा येतो ? की संयम उरला नाही ? एक अनोळखी नंबर आणि हाय , तोच चेहरा , तोच फील , तीच नजर …. स्वप्नात आहे का नाही हा विचार करण्याची आता हिम्मत होत नाही बहुतेक , नक्कीच हे खरं असणार , ओळखीच्या आणि वेळेच्या कचाट्यात चेहरे विसरलेलो आपण , कॉलेजमध्ये एका वर्गातले , बोलण्यात एवढं समजलं आपल्याला जे हिरोईक वाटतं कॉलेज मध्ये ते मुलींना छपरी वाटायचं , पण मी तसा नसतो तर आज दखल घेतली असती का ? पण मी आता तसा नाहीय म्हणून हे सारं ….
      कामाला जाऊन तिच्या बोलण्यात जबाबदारी , मी अजून अलबेल , ती वेळ घालवू पाहे तर मी कमिटमेंटसाठी हावरा , मुली नेहमी ब्यालन्स्ड कश्या वागू शकतात , दुसर्याबद्दल मोह वाटावा अस काहीच बोलण्यात दिसू देत नाहीत , आपण जाम विचार करतो , लगेच घोडे पळवू लागतो …..
      आपल्या सोबत शिकलेल कोणीतरी अस अचानक आपल्याला कस सुंदर वाटू लागतं काही वर्षांनी , ती व्यक्ती कामाला जाते म्हणून जेलसी वाटते का हेवा वाटतो , जबाबदाऱ्या पार पडणारे सेटल वाटतात आजकाल , अभ्यास असा काय असतो , निकाल पैसानेच लागतात आजकाल , पण आजचा दिवस फार छान होता , बरेच दिवसांनी कोणासोबत तरी बोलणं झालं , कुणीतरी आपली दखल घेतंय तर … हे सगळं विचारचक्र थांबवू पाहत आहे , गाणी हा एकच पर्याय आहे …..
       सकाळी गादीवर ऊब लागत होती , लेट जाग यायला लागली , बाहेर ऊन पडलं आणि आतमध्ये लादिला पाणी सुटू लागलं , माझा एक पाय लादिवर जाऊन मला कालचा पाऊस आठवू लागला , बंद डोळ्यांना दृश्य दिसू लागली , तो चिखल आणि त्यातून सहजतेने चालणारी ती पावलं…. दचकन उठलो , डोळे चोळले आणि मोबाईल पाहिला …काहीच नाही….!!!

*अजिंक्य रोकडे*

#बाकीअलबेल
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....