Skip to main content

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पहावं , कस वाटलं असेल तिला , ती गेली , पाहत बसलो , एरवी वेळेवर न येणाऱ्या महामंडळाच्या गाड्या आज मात्र वेळेवर येऊ पाहत होत्या , ती गाडीत बसली , गाडी जाईपर्यंत पाहत बसलो , शेवटचा घास आनंदाने खाऊ म्हणलं तर मिरची दाताखाली आली , खूप पाणी प्यायलो …..
      मला तुम बिन २ आवडलेला , खरच आवडलेला , त्यातलं कोणतंही गाणं मी ऐकायचा मूडला आलेलो , मी आठवू लागलो काहीतरी कनेक्शन आहे राव ….!!! 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

        घरी आल्यावर समजलं आपण भिजलो आहोत , रेनकोटच्या चैनीतून पाणी आतमध्ये येतच कस , शरीराची एक लाईन पूर्ण भिजली , मुळात रेनकोट घालवाच का मग ? मूळ उद्देशच जर गंडत असेल तर काय फायदा ? शेवटी टॉवेलने अंग सहज पुसलं जातं , पण केस लगेच सुकत नाहीत , ओलावा राहतो  डोक्याचा स्किनवर…. रेनकोट कोकणच्या पावसात फसतो …!!! चुलीजवळ जाऊन ऊब मिळतेय पण थोड्या वेळाने त्याचे पण चटके लागतात …. अंधार पडला , जेवलो आणि गादी अंथरली , आजकाल व्हाट्सएपचे मेसेज बाहेर दिसत का नाही मला , आधी कॉलेजला असताना मोबाईलच्या हर एक सेटिंग करता येत होत्या मला आता का जमत नाहीत ? का मला करायला कंटाळा येतो ? की संयम उरला नाही ? एक अनोळखी नंबर आणि हाय , तोच चेहरा , तोच फील , तीच नजर …. स्वप्नात आहे का नाही हा विचार करण्याची आता हिम्मत होत नाही बहुतेक , नक्कीच हे खरं असणार , ओळखीच्या आणि वेळेच्या कचाट्यात चेहरे विसरलेलो आपण , कॉलेजमध्ये एका वर्गातले , बोलण्यात एवढं समजलं आपल्याला जे हिरोईक वाटतं कॉलेज मध्ये ते मुलींना छपरी वाटायचं , पण मी तसा नसतो तर आज दखल घेतली असती का ? पण मी आता तसा नाहीय म्हणून हे सारं ….
      कामाला जाऊन तिच्या बोलण्यात जबाबदारी , मी अजून अलबेल , ती वेळ घालवू पाहे तर मी कमिटमेंटसाठी हावरा , मुली नेहमी ब्यालन्स्ड कश्या वागू शकतात , दुसर्याबद्दल मोह वाटावा अस काहीच बोलण्यात दिसू देत नाहीत , आपण जाम विचार करतो , लगेच घोडे पळवू लागतो …..
      आपल्या सोबत शिकलेल कोणीतरी अस अचानक आपल्याला कस सुंदर वाटू लागतं काही वर्षांनी , ती व्यक्ती कामाला जाते म्हणून जेलसी वाटते का हेवा वाटतो , जबाबदाऱ्या पार पडणारे सेटल वाटतात आजकाल , अभ्यास असा काय असतो , निकाल पैसानेच लागतात आजकाल , पण आजचा दिवस फार छान होता , बरेच दिवसांनी कोणासोबत तरी बोलणं झालं , कुणीतरी आपली दखल घेतंय तर … हे सगळं विचारचक्र थांबवू पाहत आहे , गाणी हा एकच पर्याय आहे …..
       सकाळी गादीवर ऊब लागत होती , लेट जाग यायला लागली , बाहेर ऊन पडलं आणि आतमध्ये लादिला पाणी सुटू लागलं , माझा एक पाय लादिवर जाऊन मला कालचा पाऊस आठवू लागला , बंद डोळ्यांना दृश्य दिसू लागली , तो चिखल आणि त्यातून सहजतेने चालणारी ती पावलं…. दचकन उठलो , डोळे चोळले आणि मोबाईल पाहिला …काहीच नाही….!!!

*अजिंक्य रोकडे*

#बाकीअलबेल
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किर्रर्र 🍃

   लाकडी आरामाखुर्चीवर जेव्हा रघु बसला तेव्हा 'किर्रर्र' असा आवाज आला, विचारांची साखळी काही वेळा साठी स्तब्ध झाली आणि पुन्हा स्वतःला कमफॉर्टेबल करून घेतल्यास ती साखळी नव्या विचारांना वाट करून देऊ लागली... रघु नुकताच कामावरून आलेला, समाधानी वाटाव इतकं समाधान तर होतच त्याचाकडे पण मन सैरावैरा, कानात वारा गेलेल्या वासारा सारखं वेडंवाकडं पळत होतं, ह्याच कारण अचानक गार वारं सुटलेलं, हवेत गारवा आलेला आणि त्यासोबत पालापाचोळा उडत खिडक्यानमधून आतमध्ये येत होता, एरवी तो कचराच जणू पण आज ते काहीतरी भासवत होतं, रघुने जेव्हा पहिल्यांदा गाडी घेतलेली तेव्हा लीलासोबत रघु बाईकने फिरायला गेलेला, चहाच्या टपरीवर थांबले असताना असंच काहीसं वातावरण तयार झालेलं, तिचे केस तेव्हा हवेत एक फ्रेम बनवून आकाशासोबत एक सुंदर कलाकृती बनवू पाहत होते, चहाच्या वाफा तिच्या चसम्यावर येऊ पाहत होत्या आणि ती चष्मा व्यवस्थित करू पाहत होती, ओढणी सांभाळत होती अशी तिची अल्लड गडबड झालेली, रघुच्या मनात एक सुंदर आठवन, आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींच्या यादीत त्यांनी ठेवलेली ती आठवण आज मनात ह्या वातावरणाने रेंगा...

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...

आणि जिंकलो 🤍

चौदा वर्षाचा मुलाने सिक्सर शतक मारणं  आपण चषक जिंकणं  आपण किती रन्स झाले  किती ऑऊट झाले  किती गेले आणि किती बदला घेतला  आणि जिंकलो  आपण किती इनिमी किल्ल केले  आपण किती चिकन डिनर केले  आपण किती गोल्ड डायमंड प्लॅटिनम झालो  आणि जिंकलो  आपण किती कुणाची मारली  कुणासोबत कुणाची किती जिरवली  कुणाला किती लायकी दाखवली  आणि जिंकलो  आपण किती पैसा कमावला  आपण किती भारी नोकरी केली  किती सुंदर बायको केली  कसा संसार केला  आणि जिंकलो  आपण किती सर्विस केली  किती अनुभव आहे  किती पैसे उकळले  किती कुणासाठी काय केलं  आणि जिंकलो  आपण किती माज केला  आपण किती उन्माद केला  आपण कुणालाच भिलो नाय  मी अजिबात घाबरत नाय  आणि जिंकलो  इतकं सोपं सोपं हे सगळं नाय लिहलेलं समजेल इतकं पण सोपं नाय  कोण मला काय बोलेल इतकं पण सोपं नाय  कुणाच्या भावना दुखावतील इतकं पण सोपं नाय  दुखावल्या तरी काय बोलू शकत नाय  लिहीत इतकं पण सोपं नाय  बाकिआलबेल