Skip to main content

Posts

आता सोड ना कविता 🌼

आता सोड ना कविता कुठे ऐकतो  शांत आहे सारं उगा कसली वाट बघतो  मी बोललो कि तुम्ही वाह वाह करताल  झाटाची फाटा मलाच समजणार नाही तुम्ही उगाच फुगताल  हे असं रसिक वगरे  असं कवी वगरे  काही काही नसतं  असं गोड गोड श्रोते वगरे काही नसतं  असले माझ्यागत येडझवे वक्ते वगरे क्वचितच चुत्ये  काहीच काही नसतं  लक्ष्मी बोल  धंदा बोल  तराजू घे आणि किती पाप करू शकतोस ते एकदा तोल  यश लोळण घालेल येड्यागत करू नकोस  असलं नाती गोती आणि असली माणसं  सोन्याची जेजुरी वाटते पिवळी जेव्हा कावीळ आपली  कावीळ झाली कि उतारा हवा  उताऱ्याला सांगाव, तू प्रश्न कर  आलो  ना कामाला  बोल स्वप्न पाहू  असे ना तसे आलबेल होऊ  #बाकीआलबेल

प्ल्यूटो🌼

murphy's law तसा घाणेरडा प्रकार, वैज्ञानिकदृष्ट्या तो काही सिद्ध वगरे झालेला नाहीय पण तो काम करतो खतरनाक, तसं काही गोष्टी सिद्ध व्हाव्याच लागतात असं देखील काही नाही, काही गोष्टी दाबून ठेवाव्या लागतात अंतरमनात, असे जड शब्द लेख तरी भारी बनवतात नशीब कोवळ्या वयात काही पुस्तकं अशी वाचून ठेवली आहेत, त्या शिवाय भूमिकेला भक्कमपणा येत नाही, लोकांना आपण दूरचे वाटू लागतो जेव्हा सगळं तरल दिसू लागतं मग कोणत्या अपेक्षित गोष्टी न का होईना सगळं ठीकच आहे हा अट्टाहास हवा वाटतो, ह्या साऱ्या कोलाहलात आपण आपले विचार आपल्यासोबत होणाऱ्या घटना सगळ्या चिंधी म्हणून जग पाहत असेल तेव्हाच आपण घडत असलेल्या पेक्षा वाईट चिंतून बुध्दासारखे हसत असतो किंवा हळहळत असतो, एकादी गोष्ट वाईट होतच गेली तर ती वाईटच होते असं काही ऐकून पाहून वाचून अजून वाईट होण्याची शाश्वती मिळते त्यावेळेला मोटिवेशन म्हणून राशीभविष्य वाचताना लाभ होईल वाचून अजून हळहळ होते, लाभ होतात ते कोणत्या बाबतीत किती बाबतीत आणि कोणत्या परिप्रेक्षात, कोण काही सहज बोलून जातंय तेव्हा त्याचे शब्द, वागणं लाभामध्ये धरून ठेवायचे असतात का? दिवस चांगल्य...

प्रवास आपला कधी नं जावा संपून...✨🏔️

विरान पडलेल्या वाळवंटी प्रदेशात बर्फ अचानक पडावा इगलू मात्र आपला सुका सुका असावा त्यात बॅगेतून आणलेला कांदा मिरची टोमॅटो सारं काढून दोन चार पाईनची फाटी आणून आग लावावी दगडाने दगडावर रगडून तुझ्या माझ्या थरथरत्या हाताला मग आगीची उब त्या आगीवर भगूणं छोटंसं ठेवून करावे पदार्थ आपण हवे नको आपल्याला दोघांनी मिळून भूक मिटवावी घासावर घास छोटे ठेऊन पसरावी पश्मिना चादर तलम झोपावं दोघांनी कुशीत कुशी घालून स्पर्शावर स्पर्श करावा हट्टी बनून झोपेत जागेपणीची स्वप्न पुरी करावी मग पाहिलेली स्वप्न पूर्णत्वास न्यावी मग स्वप्नात स्वप्न बनून राहावं डोळ्यांवर डोळे ठेवावे काजळाने मिटून सकाळ व्हावी चेहऱ्यासमोर एकमेकांच्या चेहरे नवीन वाटावे एकमेकांचे इगलू मधून बाहेर येऊन पुन्हा वाट शोधावी पायावर पाय ठेऊन चालावी दोघांनी  प्रवास आपला कधी नं जावा संपून... अजिंक्य रोकडे

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल.. 🌼

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल तेव्हा तू जाशील दूर रानात तेव्हा तिथे खूप सारी घनदाट झाडी मिळेल पण ओलावा शोधत असताना तुला समजेल माझे विचार किती तरल होते हातात हात घेऊन जेव्हा वाळूवर पाय रोवून तुम्ही जेव्हा प्रेम करत असाल तेव्हा समजेल माझी नजर क्षितिज भेदत होती  कॅफे मध्ये वाफालणारी थंड कॉफ़ी तुम्ही एका स्ट्राव मधून पिऊ लागाल तेव्हा माझी तहान तुझ्या लाळेपेक्षा मोठी होती हे समजेल तुम्ही एकादी निर्जन जागा पहाल आडवे इन्फ्रंट होत जाल तेव्हा समजेल माझ्या मनात बस स्पर्शाच्या भावना होत्या तुम्ही उभे राहाल बोहल्यावर तेव्हा संगीत असं विरश्री मध्ये असेल पण तूला माझी आठवन येईल आणि समजेल मी कसा सुमधुर होतो.. #बाकीआलबेल अजिंक्य रोकडे

बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल 🌼

जगाविषयीची कटुता विसरून आपण प्रेम करत सुटलो पाहिजेल ह्या साऱ्या सणासुदीत आपण तारखा विसरत राहता आलं पाहिजेल मोजलेले पैसे आलेल्यातून वजा झाल्यावर हसू कायम राहीलं पाहिजेल ह्या साऱ्या वेळेत न होणाऱ्या गोष्टी आपण सहन करत ओठांवर हसू कायम ठेवता आलं पाहीजे काहीही असो आनंदी राहिलं पाहिजेल म्हणणारा कसा चुतिया आहे हे त्याने अंतर्मनाला विचारलं पाहिजेल उगा का कोण बुद्धत्वाला जातो असं वागता आलं पाहिजे कि बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल  कालातीत प्रवास करता आला पाहिजेल अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

महत्वाच काहीतरी

यात काहीही शंका नाही कि शिक्षण माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या संविधानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद कलम २१(A) अंतर्गत करण्यात आली आहे. तर अस आहे कि ७०% लोकसंख्या, जर खाजगीकरणा झाले तर हा खर्च उचलू शकणार नाहीत . गरीब व कष्टकरी मूले जर काही प्रमाणात शिक्षण घेत असतील तर मोफत शिक्षणाच्या धोरणामुळे, मूलभूत हक्काच्या मूलभूतपणाचा गाभा प्रतिष्ठा राखणे हा आहे, जर शिक्षणाचे खाजगीकरण झाले तर एक ठराविक वर्गच त्याचा लाभ घेऊ शकतो आणि इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. शिक्षणाकडे जर व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं तर शिक्षण आणि ज्ञान देणे हे मुद्दे दुय्यम होऊन फक्त आर्थिक प्राप्तीकडे कल वाढेल. मागच्या वर्षी १ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली होती तेव्हा मी लेख लिहलेला होता आणि आता देखील 'समूह शाळा' धोरण राबवण्याचा हट्ट प्रशासनाने केला आहे, या धोरणाला सगळीकडून विरोध चालू असताना देखील हा सर्वे व धोरण पुढे रेटले जात आहे. गावपाड्यात शाळा जवळ आहे म्हणून येणारी कितीतरी मुलं आहेत किंवा पोषण आहार मिळतो म्हणून येणारी मुलं आहेत आणि ही ...

चाफा कधीच कोमेजू नये 🌼

चाफा कधीच कोमेजू नये हा माझा हट्ट खरा त्याचा वास घेत राहायला हात वरती करू नये  छातीपाशी खिशात ठेऊन घेता यावा निरंतर खरं तर केसं पण पिकू नये कुणाची नां कुणाला ययातिची फिलिंग यावी नां कुणी यतीची वाट पाहावी सगळं कसं चालू राहावं कष्टाविना चालू रहावं दुःखाविना  असावं सगळं कसं आलबेल चाफा सुकू नये कधी सुवास कोमेजू नये कधी कधी वाटतं त्यांना तोडू पण नये त्यांना पण जगू द्यावं असंच सुवासिक नाकं न्ह्यावी फुलाजवळ होऊ नं द्यावा मृत्यू देव,माणूस कुणाच्या चरणी नको कुणाचा आवडता नको होऊ द्यावं त्याला चाफ्याची जिंदगी त्यालाच माहित सुंदरतेचे भोग सगळे आवडतीचे रोग सगळे मग म्हणाल चाफा बोलेना चाफा चालेना कसा चालेल कसा बोलेल चुकून विचार येऊ नये चाफा कधीच कोमेजू नये अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल